पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांची कामगार कल्याण मंडळ संभाजीनगर येथील कार्यालयात बैठक झाली. यासाठी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते. 38 crore fund announced for construction of Kamgar Bhavan
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या डॉ.भारती चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली मागील २५ वर्षापासून पाठपुरावा करत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कामगार कल्याण मंडळाला हस्तांतरण होत असलेल्या अजमेरा येथील भुखंडासंबंधी मनपा अधिकारी व कामगार कल्याण अधिकारी यांच्यात मंत्री महोदयसमवेत सकारात्मक चर्चा झाली.
आगामी काळात या ठिकाणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने या शहरातील कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक नविन योजना निर्माण केल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने माननीय मंत्री साहेब यांनी मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी केली आणि तेथील जागेवर सुनियोजित कामगार भवन उभारणीसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळाच्या माजी सदस्या डॉ.भारती चव्हाण यांनी दिली आहे.

या प्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मंत्र्यांचे स्वागत करुन त्यांना गुणवंतांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी विनायक खोराटे (अतिरिक्त आयुक्त मनपा), डॉ.भारती चव्हाण (अध्यक्षा गुणवंत कामगार मंडळ), शंकरराव जगताप (भाजपा शहराध्यक्ष), सदाशिव खाडे (प्रदेश कार्य.सदस्य भाजपा), माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर केशव घोळवे, अमित गोरखे (पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख भाजपा), माजी उपमहापौर तुषार हिंगे, यांचेसह कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त समाधान भोसले, मनोज पाटील, संजय सुर्वे, प्र.कल्याण अधिकारी संदीप गावडे, मनपाचे विजयकुमार सरनाईक (सहा.आयुक्त भूमी जिंदगी विभाग), आबासाहेब ढवळे (कार्यकारी अभियंता) सुचिता पानसरे (अ प्रभाग अधिकारी) व मुकेश कोळप (प्रशासन भूमी जिंदगी विभाग)
गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे पदाधिकारी राजेश हजारे, तानाजी एकोंडे, भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, श्रीकांत जोगदंड, महमंदशरीफ मुलाणी, अशोक सरपाते, गुणवंत कामगार व केंद्र अधिकारी, इमारत बांधकाम महामंडळ, ओद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग बाष्पके संचालनालयाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गुणवंत कामगारांना एस टी बस सवलत, कामगार भूषण संख्या वाढवणे, गुणवंतांना आरोग्य सुविधा व कन्यादान योजना लागू करणे, केंद्रातील अंगणवाडी शिक्षिकांचे मानधन वाढवणे, भोसरी परिसरात नवीन केंद्र चालू करणे आदी बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे.