कृत्रिम बुद्धिमत्ते मूळे आयटी क्षेत्रातील मध्यमवर्गामध्ये घबराट सुरू झाली आहे.
प्रस्थापित डाव्या पक्षाव्यतिरिक्त अन्य संस्था संघटना जन चळवळी शोषणाविरोधातील नव्याने संघर्ष करतील.
अभिष्टचिंतन दिनी सामाजिक कार्यकर्त्यांसमोर वैचारिक मंथन.
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : १९७० – ८० च्या दशकातील मार्क्सवादी चळवळीतील जेष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ. सुरेश बेरी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील निवडक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी आकुर्डी येथे डॉ. सुरेश बेरी यांना एका छोट्याशा अभिष्टचिंतन कार्यक्रमात शुभेछा दिल्या.
याप्रसंगी वैचारिक मंथन करताना डॉ. सुरेश बेरी म्हणाले की, जागतिकीकरणाचा उत्तरार्ध संपुष्टात आला आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची विकसित अवस्था लयाला जात आहे. निसर्गातील साधन संपत्ती, मानवी श्रम बुद्धीचे प्रचंड शोषण करूनही १९२९ च्या महाअरिष्टानंतर जागतिक भांडवलशाही अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. मागील पाच वर्षात पर्यावरणीय अरिष्ट सुसंपन्न युरोप, अमेरिका सह भारतात मोठ्या प्रमाणात वाढले आहे,उच्च तापमानवाढीचा चटका संपूर्ण भारतात पसरला आहे. जागतिक कृषी उत्पादने घटत आहेत.अति उजव्या धर्मांध विचारसरणीच्या आधारे सरकार दबाव दडपणे वाढवत आहेत.
एकीकडे किमान १० हजार रुच्या तुटपुंज्या वेतनावर लक्षावधी असंघटित कंत्राटी कामगार दोन दशके गुलामगिरीत नोकऱ्या करत आहे. ती नोकरी जाईल या भयाने न्याय मागण्यासाठी हा श्रमीकवर्ग संघटित होत नाही. चाट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर सर्व उद्योगात वाढला आहे, त्यामुळे मध्यमवर्गाच्या नोकऱ्या जात आहेत. सुखवस्तू जीवन जगण्याच्या आकांक्षा बाळगणारा अच्छे दिनाचे स्वागत करणारा हा वर्ग पुढील काही वर्षात उध्वस्त होणार आहे. पर्यावरणीय संकटापेक्षा ‘एआय’चा मोठा धोका आहे.
भारतात जन चळवळी शांत आहेत
निम्म्या पगारावर काम करा, वर्क फ्रॉम होम मूळे १२ तासाहून जास्त काम लादले जात आहे. उमेदवारांना नोकरीची ऑफर लेटर कंपन्या देत आहेत, पण अजून आमच्याकडे काम सुरू झाले नाही, म्हणून वर्ष वर्ष लोकांना अडकवून ठेवले आहे. सरकारी सेवा उद्योग, खाजगी उद्योगातील सर्व कामात ठेकेदारी व्यवस्था आहे. त्यामुळे आर्थिक विषमता, पिळवणूक वाढली आहे. असे डॉ.सुरेश बेरी यांनी सांगितले.
आमच्या काळात १९९० पर्यंत मार्क्सवादी, समाजवादी, लढाऊ कम्युनिस्ट चळवळी किमान कल्याणकारी योजना सरकारने राबवाव्यात, श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत होत्या. भारतातील प्रस्थापित डावे, कम्युनिस्ट पक्ष संसदीय प्रणालीत अडकले आहेत. मागील दोन दशकात धर्मांध उजव्या विचारसरणीला रोखण्यात ते अपयशी ठरले आहेत. दैनंदिन जीवनात लोक प्रताडीत होत आहेत. किती दिवस श्रीराम जय राम जय जय राम म्हणत लोक जगणार आहेत.
युरोपातील मध्यमवर्ग, कामगार वर्ग रस्त्यावर संघर्ष करत आहे,देशातील डाव्या पक्षांकडून होणारी जनआंदोलने कमी झाल्याने त्यांचा जनाधार कमी होत आहे. भारतातील प्रस्थापित डाव्या पक्षाव्यतिरिक्त इतर संस्था, संघटना देशातील विविध शहरात, ग्रामीण भागात जन आंदोलने चालवत आहेत, काळाच्या ओघात हे सर्व एकत्र येतील व शोषणाविरोधात मोठी चळवळ देशात जन्म घेईल, असा विश्वास डॉ .सुरेश बेरी यांनी व्यक्त केला.
आकुर्डी येथे आयोजित या अभिष्टचिंतन कार्यक्रमात वैचारिक मंथन करण्यात आले. यावेळी ऍड.रमेश महाजन, ऍड.मनीषा महाजन, साथी अरुण थोपटे, जमीर मुल्ला, स्वप्निल जेवळे, रुकसाना काझी आदी उपस्थित होते.
---Advertisement---
---Advertisement---
“डाव्या पक्षांकडून होणारी जनआंदोलने कमी झाल्याने त्यांचा जनाधार कमी होत आहे” , जेष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ. सुरेश बेरी यांचे परखड प्रतिपादन !
---Advertisement---
- Advertisement -