नवी दिल्ली : अनेक कामगार संघटनांनी बुधवारी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या रॅलीत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी हजारो कामगार, शेतकरी, शेतमजूर यावेळी उपस्थित होते.
सेंटर ऑफ ट्रेड युनियन्स (CITU) , अखिल भारतीय किसान सभा (AIKS) आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियन (AIAWU) यांनी रामलीला मैदानावर किसान संघर्ष रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीला संबोधित करताना नेत्यांनी सरकारला इशारा दिला की, ही रॅली देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार युनियन, कामगारांच्या वाढत्या संतापाचे द्योतक आहे. देशाच्या विविध भागांतून हजारो कामगार, शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले होते.
महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू – काश्मीर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, गुजरात या राज्यांमधून शेतकरी, कामगार, शेतमजूर आले होते. शेतकरी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य सेवा मिळायला हवी आणि एक सन्मानीय आयुष्य जगता यावे, असे धोरण राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, कामगार सहिंता रद्द करा, किमान वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या, आरोग्य सुविधा मोफत द्या यांसह अन्य मागगण्या करण्यात आल्या.
---Advertisement---
---Advertisement---
लाखो शेतकरी, कामगार व शेतमजूरांचे दिल्लीमध्ये आंदोलन, ‘या’ प्रमुख मागण्या
---Advertisement---
- Advertisement -