Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अर्थमंत्री सीतारमण यांना ‘काळी नागीण’, ‘सर्वात वाईट अर्थमंत्री’ यामुळे लोक मरत आहेत, म्हणत खासदार बॅनर्जी यांनी केली टीका

---Advertisement---

(कोलकत्ता):- पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात एका मेळाव्याला संबोधित करताना टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टीका केली आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्था नष्ट केली त्यामुळे लोक मरत आहेत.

      टीएमसीच्या एका नेत्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थव्यवस्था हाताळल्याबद्दल ‘काळी नागिनी’ (विषारी साप) यांच्याशी तुलना केली आणि तिला सर्वात वाईट अर्थमंत्री म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील मेळाव्याला संबोधित करताना श्रमपूरचे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, ‘काळ्या नागिनी’च्या चावल्यामुळे लोकांचा मृत्यू कसा होतो? त्याचप्रमाणे निर्मला सीतारमण यांच्यामुळे लोक मरत आहेत. त्यांनी अर्थव्यवस्था उध्वस्त केली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्या सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे.

---Advertisement---

 

     यावर भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी म्हंटले आहे कि, तृणमूल काँग्रेसच्या खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना ‘काळी नागिन’ म्हटले आहे, जे अत्यंत निंदनीय आहे. अशी टिप्पणी केली गेली आहे की, प्रत्येक घरात देवी कालीची पूजा केली जाते. ही टिप्पणी केवळ वर्णद्वेषीच नाही तर चुकीचा शब्द उल्लेख देखील आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles