Thursday, April 25, 2024
Homeकृषीठाकरे सरकारची मोठी घोषणा : अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज...

ठाकरे सरकारची मोठी घोषणा : अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी आणि पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तसेच, जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर. ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय