---Advertisement---
---Advertisement---
औरंगाबाद:-जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून आज सकाळी १५९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. काल घेतलेल्या १३६१ स्वॅबपैकी १५९ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८१०८ इतकी झाली आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून आतापर्यंत ४४६३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत ३४२ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे सध्या एकूण ३३०३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज वाढलेल्या १५९ रुग्णांपैकी ७९ पुरुष तर ८० महिला आहेत.तसेच यापैकी मनपा हद्दीतील ११२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ४७ रुग्णांचा समावेश आहे.