Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शिवसेना वचननामा ही तर जनतेची फसवणूक; मुख्यमंत्र्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

---Advertisement---


नागपूर
 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  जाहीरनाम्यातून राज्यातील वीज ग्राहकांना (जनतेला) काही वचन दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. यांच्या वचननाम्याची प्रत सोबत जोडली आहे. या अत्यंत महत्वाच्या आश्वासनाचा प्रचार त्यांनी विदिओ, पत्रके, भाषणे, ट्विटर अश्या विविध माध्यमातून केला होता. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या ५६ उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

---Advertisement---

यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे यांची राजकीय आणि नैतिक जबाबदारी होती, परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे. या उलट देशात आणि राज्यात महामारीचे संकट असतांना दि.१ एप्रिल २०२० पासून वीज दरवाढ करून राज्यातील जनतेला फसवले आहे. तसेच रु ३ प्रति युनिट प्रमाणे तयार होणारी विज रु १५ प्रमाणे देवून जनतेची लूट चालू असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

फसवले गेलेल्या जनतेला घेऊन आम आदमी पार्टीने वीजबिल माफी व किमान वीजदर कपातीची मागणी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे. त्यासाठी सोशल मिडिया वरून मागणी, निदर्शने, इमेल पत्र व पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे वीजबिल माफ करण्याचे वा दरकपातीसाठी हजारो अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिले आहेत. पालक मंत्र्यांच्या घराचा घेराव, वीज कार्यालयांना ताला ठोको, अशी आंदोलन केली परंतु सरकारने यास प्रतिसाद दिलेला नाही.

ज्या अर्थी सरकार पक्ष असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री निवडणुकी दरम्यान दिलेले आश्वासन पाठपुरावा करूनही पाळत नाही त्याअर्थी ही जनतेची जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे, असा आरोप करत भारतीय दंड संहिता कलम ४१५ ( फसवणूक ) आणि ४२० ( अप्रामाणिकपणा – बेईमानी ) प्रमाणे हा गुन्हा आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम १२३ (ब) (भ्रष्ट व्यवहार-पद्धती) प्रमाणे मते मिळवण्यासाठी खोटी आश्वासने देता येत नाहीत. ही जनतेची फसवणूक ठरते.

याच पद्धतीने जर आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असेल तर त्या व्यक्ती वा संस्थेवर IPC ४२० अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. अशाच प्रकारचे आमिष दाखवून राज्यात उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत व आता जाणीवपूर्वक आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारी च्या संकट काळी वीजदर वाढवून जनतेसोबत बेईमानी केली असल्याचा आरोप केला आहे.

यामुळे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राज्यभरात पोलिस तक्रार दाखल करण्यात आल्या आहे. ही पोलिस तक्रार नागपुर शहरात २५ पेक्षा अधिक पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली.

ही तक्रार आपचे राज्य समिती सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंघ, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संयोजक कविता सिंघल, संघटन मंत्री शंकर इंगोले व नागपुर सचिव भूषण ढाकूलकर यांच्या नेतृत्व करण्यात आली आहे. 

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles