Friday, March 29, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषदेच्या ३३६ शाळा बंद करण्याचे प्रस्तावित आदेश रद्द करा – DYFI...

जिल्हा परिषदेच्या ३३६ शाळा बंद करण्याचे प्रस्तावित आदेश रद्द करा – DYFI – SFI ची मागणी

वाडी आणि तांड्यावरील शाळा बंद करण्याचे हुकूमी निर्णय वापस घ्या – स्टॅलिन आडे

डी.वाय.एफ.आय आणि एस.एफ.आय युवक विद्यार्थी संघटना आक्रामक, …अन्यथा घेराव आंदोलन करणार

किनवट : नांदेड जिल्हातील विविध तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३३६ शाळा तथा किनवट तालुक्यातील ७१ शाळा बंद करण्याच्या प्रस्तावीत निर्णय रद्द करा, अशी मागणी डेेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या युवक आणि विद्यार्थी संघटनांनी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी नांदेड यांना गट शिक्षणधिकारी किनवट यांच्या मार्फत केली आहे.

डीवायएफआय चे जिल्हा सचिव स्टॅलिन आडे म्हणाले, शिक्षण उपसंचालक लातुर यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पट संख्याचे कारण पुढे आणुन पट संख्या कमी असलेल्या शाळांचे इतर शाळेत समायोजन करण्याचे प्रस्तावीत करण्यात आले अाहे, समायोजनाचे अंतर हे कमी जरी वाटत असले तर भौगोलिक दृष्टिकोनातून हे अंतर प्रचंड लांब आहे. किनवट, माहुर, सारख्या तालुक्यात डोगंर,दर्यात अनेक वस्ती, वाडी, तांड्यातील आदिवासी, दलित, बहुजन वर्गातील विद्यार्थी जे शिक्षणापासुन कोसो दुर आहेत त्यांना कायमच शाळा बंद करुन शिक्षण क्षेञातुन बाहेर काढण्याचे हा निर्णय असुन हा हुकूमी निर्णय वापस घ्या असेही ते म्हणाले.

तालुक्यात मांजरीमाथा, गोंडखेडी, वसंतवाडी, प्रेमनगर, दत्त नगर, मार्लागोंडा, तोटंबा अशा अनेक अतिदुरगम भागातील शाळा बंद होण्याचा अर्थ विद्यार्थी कायमच शिक्षण क्षेञातुन बाहेरे जातील तातडीने जिल्हातील जि.प च्या ३३६ शाळा बंद करण्याचे प्रस्तावीत निर्णय रद्द न केल्यास हजारो विद्यार्थी, पालक,आणि जनतेला सोबत घेऊन बेमुदत घेराव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातुन देण्यात आला आहे.

यावेळी स्टॅलिन आडे, प्रफुल कऊडकर, ओकांर आञाम, आशीष भवरे, सचिन सिडाम, विवेक धुर्वे, अभिलाष कोडमेते व विद्यार्थी युवक उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय