Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन (Ramoji Rao Passed Away) झालं आहे. आज सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.
रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जाते. ते रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे मालक होते. 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषणनेही सन्मानित करण्यात आले होते. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने ५ जूनला त्यांना हैद्राबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि रामोजी राव यांची प्राणज्योत मावळली. ते ८७ वर्षांचे होते. रामोजी राव यांच्या निधनाने दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील एका लहानशा गावात झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून केली होती. त्यानंतर त्यांनी ‘ईनाडू’ या तेलुगू दैनिकाची स्थापना केली, जी आज तेलुगू भाषिक जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
रामोजी राव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांचे मुख्यमंत्री, आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Ramoji Rao यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार
रामोजी राव यांचे पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. येथे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करतील. तेलंगणा सरकारने रामोजी राव यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत
10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी
ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित
एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा