पिंपरी चिंचवड : चिपळूण, सांगली येथील पूरग्रस्त कुटुंबाना चिखलीतील नगरसेविका अश्विनी जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी जीवनावश्यक किराणा, पाण्याच्या बाटल्या, औषधे याचे वितरण केले. १ हजार १०० पूरग्रस्त कुटुंबाना मदत वितरित करण्यात आली.
प्रभाग 2 मधील राजेशिवाजी नगर, जाधववाडी, पंतनगर मधील विविध सोसायटीमधील नागरिकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे त्यांनी आवाहन केले होते.
या मोहिमेमध्ये राजू बनकर, लखन कड, कलमेश परदेशी, जमीर शेख, संजय आल्हाट, अथर्व गोरे, जावेद भाई सामील होते.