स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती रस्ता सुरक्षा अभियाना साठी प्रचार (PCMC)
चिंचवड येथे यशवंत कन्हेरे (ब्रँड अँबेसिडर, स्वच्छता अभियान पिंपरी चिंचवड महानगरपालिका ) यांचे स्वागत.
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वच्छतेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पिंपरी चिंचवड शहरातील या अवलियानं प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छता, रस्ता सुरक्षा आणि प्लास्टिक पिशवी मुक्तीचा जागर करण्यासाठी चक्क मोटारसायकलवरून महाराष्ट्रात फिरुन प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली आहे. यशवंत कन्हेरे असं या अवलियाचा नाव आहे. ते ६९ वर्षे वयाचे आहेत. त्यांचा हा मोटारसायकलवरील प्रवास आणि अनुभव आजच्या पिढीला नक्कीच विचार करायला लावणारा आहे. गुरुवारी त्यांचा प्रवास पिंपरी चिंचवड शहरात येथे समारोप झाला. (PCMC)
सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले, मारुती जाधव, सुनील गाडे,प्रतिभा टोरपे, मनीषा डुंबरे, मधुकर धकाते, कल्पेश कन्हेरे माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, समर्थ ऑटोचे मालक सुनील बर्गे यांच्या सह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यशवंत कन्हेरे यांचे हलगीच्या वाद्यात मिरवणूक काढून श्री गणेश मंदिर महात्मा फुलेनगर येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते. (PCMC)
प्रसंगी नागरिकांच्या वतीने महासंचालक शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत कन्हेरे यांच्यासह नागरिकांनी स्वच्छता व प्लास्टिक पिशवी मुक्तीचा संदेश देणारे फलक कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देऊन घो-षणाबाजी बाजी केली.
यशवंत कन्हेरेंचा प्रवास प्रेरणादायी
यशवंत कन्हेरे हे दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत प्रवास करुन ठिकठिकाणी संस्था, शाळा, सार्वजनिक ठिकाणी, स्वच्छतेचे आणि प्रदुषण मुक्ती संदर्भात काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करतात. तसंच ते स्वतः स्वच्छता करतात. हेल्मेट वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, ओला कचरा कोरडा कचऱ्याचं वर्गीकरण करा, अशा पद्धतीच्या संदेश फलक घेऊनही प्रसार करत आहेत. ६९ व्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत राज्यभर मोटारसायकलवरून स्वच्छतेचा जागर करत प्रवास करणाऱ्या यशवतं कन्हेरे यांचा हा प्रवास इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
आपणास ३६ जिल्हे शक्य नसले तरी आपल्या परिसरातील ३६ ठिकाणी शोधून त्या परिसरात स्वच्छता अभियान राबवला तर त्यांच्या अभियानाची पोचपावती असेल असे चिखली पोलीस स्टेशनचे महासंचालक राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल साळुंखे यांनी आवाहन केले. (PCMC)
तसेच नागरिकांनी आर्थिक गुन्हेगारीपासून सावध कसे राहावे यासंदर्भात माहिती देत स्वतःचा मोबाईल नंबर देत थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले.