---Advertisement---
मुंबई, दि. २५ : राज्यात कोरोनाचे संकट रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींंना १५ व्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी कोव्हीड केअर सेंटर उभारण्यासाठी खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
---Advertisement---
मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे बोलत होते.