Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शहरात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव; डॉक्टरांनीही दिला होता इशारा !

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संख्येमध्ये ही वाढ होता असताना सरकार खबरदारी घेताना दिसत आहे. परंतु सरकारने दसरा दिवाळीतील निर्बंध उठवल्यामुळे देशभर कोरोना संक्रमण वाढलेले आहे, असा आरोप ही होत आहे.

---Advertisement---

मग आरोग्यापेक्षा सरकारला मार्केट मधील उलाढाल महत्वाची वाटली काय? असे ही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जनतेला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. या महामारीचा मोठा झटका पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी अनुभवला आहे. तरी सुद्धा सणाच्या काळात लोक निष्काळजी राहिले. सर्व नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन शांत होते. परिणामी नागरिक पुन्हा दुसऱ्या लाटेला बळी पडू शकतात. शहरातील अनेक डॉक्टरानी याबद्दल वारंवार इशारा दिला होता. पिंपरी चिंचवड मनपाकडे दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोणती योजना आणि तयारी आहे, याची माहिती तरी समोर येणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड आजपर्यंत ९१ हजार ०३८ रुग्ण संख्या असून सध्या २ हजार १०६ रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे दिवाळी नंतर उद्योगांनी उत्पादन वाढवले आहे. कामगारांना ओव्हरटाईम देऊन काम करून घेतले जात आहे.कारण मार्चमधील लॉकडाऊन मुळे सलग चार महिने उद्योग बंद होते. आणि संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लादले तर कामगारांची उपस्थिती कमी होईल. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

आकुर्डी येथील डॉ. अनिता काजळे म्हणतात, कोरोना अतिशय वेगाने संक्रमित होतो. WHO आणि ICMR या संस्थांनी मार्चमध्ये याचे गंभीर परिणाम जाहीर केले होते. या आजारावर कोणतेही औषध इंजेक्शन उपलब्ध नाही.हा जंतू फुप्पूसात हल्ला करतो. परिणामी श्वसनसंस्था, रक्ताभिसरण, किडनी, मेंदू याचे कार्य बिघडते. कडक उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी जसे आपण सावली आणि घराचा आधार घेतो, त्याचप्रमाणे संक्रमणपासून वाचण्यासाठी सर्व काही नियम पाळले पाहिजेत. कोरोना पासून वाचलेले हजारो लोक आजही श्वसनाचा त्रास सहन करत आहेत. डॉक्टर आणि पोलीस मृत्युमुखी पडलेले आहेत. स्वतःच्या जीवाची काळजी कोणी घायची हे जनतेने ठरवावे.

तर डॉ. सुरेश बेरी म्हणतात, मास्क न वापरल्यामुळे ड्रॉपलेट्स तोंडावर उडतात, जंतुसंसर्ग तोंड आणि नाकावाटे होतो. नागरिक बोलताना मास्कखाली ओढतात, मग मास्क घालून उपयोग काय ?

त्यामुळे नागरिकांनी नियमांंचे काटेकोरपणे पालन करण्याची नितांत गरज आहे. तसेच प्रशासनाने सुध्दा सर्तक राहून नियमांची काटेकोरपणे अमंलबजावणी करणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles