Friday, April 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअग्निवीरांच्या महत्वाकांक्षेला काँग्रेसचा राजकीय खोडा आमदार महेश लांडगे यांची टीका

अग्निवीरांच्या महत्वाकांक्षेला काँग्रेसचा राजकीय खोडा आमदार महेश लांडगे यांची टीका

पिंपरी चिंचवड : केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील राष्ट्रप्रेमी तरुणांना केवळ रोजगाराच्या नव्हे, तर देशसेवेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या थेट भरती योजनेस मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनीच या योजनेची प्रशंसा केली. त्यामुळे काँग्रेसच्या स्वार्थी राजकीय हेतूचा मुखवटा उघड झाला, अशी टीका भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, अग्निपथ ही लष्कराच्या व्यापक आधुनिकीकरणाची क्रांतिकारी योजना आहे, अशा शब्दात या योजनेची प्रशंसा काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी एका लेखात केल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. दुसरीकडे या योजनेतून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेस तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून पंचेचाळीस हजार पदांच्या भरतीसाठी सहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याने देशातील तरुणाईने या योजनेचा स्वीकार केल्याने काँग्रेसचा तिळपापड झाला आहे.अशी टीका देखील त्यांनी केली.

देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवादी कारवाया आणि परकी शक्तींनी पुकारलेले छुपे युद्ध अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांना सिद्ध करणाऱ्या या योजनेस विरोध करण्याकरिता काँग्रेससारख्या राजकीय विरोधकांनी देशात तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू केले आहे. केवळ मोदी सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेस अपशकुन करण्यासाठी राजकीय विरोधक बेरोजगारीच्या समस्येचे भांडवल करून निष्पाप तरुणांची माथी भडकावत आहेत. अग्निपथ योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे अर्थव्यवस्थेत नव्याने निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकऱ्यांच्या अनेक संधींचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे चिथावणीच्या कारस्थानास युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन करत आमदार लांडगे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय