मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.
उदय सामंत काय म्हणाले ?
– राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार.
– दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार.
– परिक्षा ही ऑनलाईन होणार.
– काही कारणास्तव विद्यार्थी ऑनलाईन परिक्षांना उपस्थित न राहिल्यास पुन्हा परिक्षेची संधी देण्याच्या सूचना.
– महाविद्यालयांना व विद्यापीठांना हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश.
– महाविद्यालयांची विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना.
– विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना.
– ५० टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरू राहणार.