अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर गोंधळ उडाल्याची घटना घडली. पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव करत विजय मिळवला. मात्र, पराभवानंतर शिवराज राक्षेने संतापाच्या भरात पंचाला लाथ मारली आणि त्यांच्या कॉलरला धरल्याने स्पर्धास्थळी एकच गोंधळ उडाला. (Maharashtra Kesari 2025)
पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. रागात त्याने पंचाला लाथ मारली आणि कॉलरही पकडली. यामुळे स्पर्धास्थळी तनाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
(Maharashtra Kesari 2025)
दरम्यान, या घटनेनंतर कुस्तीप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शिवराज राक्षेने “माझी पाठ टेकली नव्हती” असे म्हणत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून, त्याने लाथ मारल्याचा आरोप फेटाळला आहे. आता महाराष्ट्र कुस्ती महासंघ या प्रकरणी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून येत आहे. या गोंधळामुळे कुस्तीप्रेमींमध्येही अस्वस्थता पसरली.


हे ही वाचा :
मोठी बातमी : सापुतारा येथे बस दरीत कोसळून 7 मृत्यूमुखी, 15 जखमी
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
ब्रेकिंग : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या
धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या
क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू