चांदवड (सुनिल सोनवणे) : चांदवड तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आमदार व पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. चांदवड शहराने व तालुक्यातून तसेच मतदार संघातून दिलेला भरघोस मतदानाचा प्रतिसाद बघता डॉ. भारती पवार यांनी चांदवडकडे चांगलेच लक्ष वेधले आहे.
चांदवड शहरातील, तालुक्यात तसेच दिंडोरी लोकसभा क्षेत्रात अनेक कामे मार्गी लावताना आपल्याला या मंत्रीमहोदया दिसत आहे. यांचा या कामाची पावती म्हणून यांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रिपदासाठी निवड झाल्याची चर्चा होत आहे.
शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असो की व्यापारी वर्गाचा प्रश्न असो की, तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा आढावा असो, प्रत्येक कामासाठी जीवाचं रान करून धावपळ करत प्रत्येक कार्यकर्त्यासाठी वेळ देणाऱ्या या डॉ.भारती पवार यांच्या भेटीला चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल आहेर, नाशिक जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष केदानाना आहेर, चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा परिषद गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, पंचायत समिती सभापती विजय धाकराव, मा. सभापती नितीन गांगुर्डे, गणेश महाले, योगेश ढोमसे, सुभाष पुरकर, युवा भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम भवर, धोडंबे येथील सरपंच संदीप काळे, शुभम निकम, वैभव धामणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड देवळा विधानसभा मतदार संघासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात यावा व यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून विधानसभा मतदार संघाचा व जिल्ह्याचा शेतकरी व कष्टकरी वर्गाचा आर्थिक परिस्थिती सुधारेल व असलेले प्रश्न मार्गी लागतील. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्या शेतकरी वर्गाचा शेतकऱ्यांचा कच्चामाल तयार होतो त्यासाठी जास्तीत जास्त कसा हमीभाव मिळेल यासाठी प्रयत्न करावे व सुजलाम-सुफलाम असे कार्यक्षेत्र बनावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विविध प्रस्ताव मांडून निधीसाठी मागणी देखील केली.
तसेच भुषण कासलीवाल यांनी चांदवड नगरपरिषद हद्दीत झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 120 घरे मंजूर झाली असून या प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत, 120 घरापैकी केंद्र शासनाचे पैसे नगर परिषदेस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे जेणेकरून त्यांना स्वतःच्या हक्काच्या पक्या घराचे स्वप्न साकारता येईल यासाठी मागणी केली. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याचा अंदाज मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वी रडारची मागणी केली ती लवकरात लवकर पूर्ण करावी व येथील शेतकरी वर्गास दिलासादायक बातमी मिळावी जेणेकरून काही तास अगोदर येथील हवामानाचा अंदाज आल्याने शेतकरी वर्गाला येणाऱ्या वारे-वादळ तसेच बेमोसमी पावसाचा अंदाज घेता येतो. यामुळे शेतीचे व इतर होणारे नुकसान हे कळते त्याला वेळीच लगाम बसतो व पूर्व तयारी करता येते यासाठी आम्हाला ही कामे प्रायोगिक तत्त्वावर मार्गी लावून द्यावी अशी विनंती केली.