गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या ठिकाणी अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडो पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
Maharashtra: Bodies of at least six Naxals recovered in the forest area of Etapalli, Gadchiroli in an ongoing encounter between the C-60 unit of Maharashtra Police and Naxals. More details awaited.
— ANI (@ANI) May 21, 2021
पैदीच्या जंगल परिसरात काल रात्रीपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरुवातीला आठ ते दहा नक्षलवादी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र नंतर १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे पोलिसांचं हे एक मोठं यश मानलं जात आहे.