Wednesday, January 15, 2025
HomeNewsमोठी बातमी : 17 ऑगस्टपासून ग्रामीण आणि शहरी भागातील 'हे' वर्ग सुरु...

मोठी बातमी : 17 ऑगस्टपासून ग्रामीण आणि शहरी भागातील ‘हे’ वर्ग सुरु होणार !

मुंबई / रफिक शेख : महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुर करण्यासंदर्भात मोठा निर्णय काही दिवासांपूर्वी जाहीर केला होता. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेचा निर्णय पालिका आयुक्त घेणार !

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय