Friday, March 14, 2025
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हेरवाड गावचा नवा आदर्श ; महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद ,शासन निर्णयाचे सर्वत्र स्वागत !

 

मुंबई : कोल्हापूर जिह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करून राज्यासमोर आदर्श ठेवला. हा आदर्श घेऊन आता राज्यभरात विधवा प्रथा बंद करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

महागाई, बेरोजगारी व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शेतकरी कामगार संघटना आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

ब्राम्हण्यवादी अपस्मार : ‘केतकी चितळे’ नावाच्या विकृतीला डॉ.अभिजित वैद्य यांचे खुले पत्र

आज भारत विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. आता सरकारने विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी ग्रामपंचायती काम करावे, असे आवाहन शासन परिपत्रक जारी करत करण्यात आले आहे.

या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱया हेरवाड ग्राम पंचायतीचे सरपंच पाटील आणि ग्रामविकास अधिकारी कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले. कोल्हापुरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात घरातील कमावती कर्ती माणसे मरण पावली. कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले. हेरवाड ग्राम पंचायत पॅटर्न राज्यात राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा रूग्णालय, उस्मानाबाद येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज !

तुळजाराम महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे तब्बल 169 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Related Articles

- Advertisement -

Latest Articles