नवी दिल्ली, 22 जून : आज नवी दिल्लीत राजकीय पक्ष तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींंची एक महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रमंच संघटनेने ही बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल कॉग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय परिषद, आरएलडी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. भाजप विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खलबतं सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती.
बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा ?
माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, शरद पवारांनी ही बैठक बोलावली नव्हती. ही बैठक यशवंत सिन्हा यांनी बोलवली होती. काँग्रेसला आम्ही वेगळे सोडले हे चुकीचे आहे. काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. राजकीयदृष्ट्या कोणताही कार्यक्रम नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणत्याही निर्णयासाठी बैठक बोलावली नव्हती.
■ बैठकीत उपस्थितांची नावे :
● शरद पवार
● सुप्रिया सुळे
● यशवंत सिन्हा
● पवन वर्मा
◆ डी राजा
● ओमर उब्दुल्लाह
● जस्टिस ए. पी. शाह
● जावेद अख्तर
● अॅडवोकेट माजिद मेमन
● खासदार वंदना चव्हाण
● सुधंद्र कुलकर्णी
● अरूण कुमार, अर्थशास्त्रज्ञ
● निलोत्पल बसू, माजी खासदार सीपीएम
● जयंत चौधरी
● घनश्याम तिवारी, समाजवादी पार्टी
● बिनॉय विश्वास, खासदार
● सुशील गुप्ता, आम आदमी पार्टी
● के. सी. सिंग