बारामती : आज दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ वा स्वातंत्र्य दिनी, कृषी महाविद्यालय सोनई, (ता.नेवासा) येथील कृषिदुत राजरत्न महेंद्र सरोदे यांनी जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी येथे सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात यशस्वीरित्या सहभाग नोंदवला.
वाचा सविस्तर ! केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ?
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषी दुत राजरत्न महेंद्र सरोदे याने तेथील शिक्षक वृंद व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत शेतीपूरक व्यवसाय, पाण्याचे महत्त्व, पाणीवापर नियोजन काळाची गरज, वृक्ष लागवड व संवर्धन आदी बाबी विषयी चर्चा केली व शाळेतील मुलांना व ग्रामस्थांना कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझर चा वापर करण्याचा व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा व इतर बाबींची काळजी घेण्यास सांगितले.
जाणून घ्या ! केळी खाण्याचे फायदे व तोटे
सदर कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दरेकर मँडम, उपमुख्याध्यापक हिरवे व इतर शिक्षक व ग्रामस्थ दिपक तारकुंडे, नगरसेविका ज्योती सरोदे, माजी सरपंच जय पाटील, नगरसेवक समीर चव्हाण, युवा उद्योजक रत्नदीप सरोदे व रोहन थोरात आदी उपस्थित होते.