Maharashtra Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा तर एकूण 26 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून, महाराष्ट्रातही शोककळा पसरली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली तारिख)
Pahalgam Attack | मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हल्ल्यात मृत्यू पावलेल्या सहा नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. या निर्णयाची औपचारिक घोषणा मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. (हेही वाचा – मेंढ्या चारायला गेला तेव्हा फोन आला, बीरदेव ढोणे IPS झाला ; वाचा प्रेरणादायी प्रवास)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेप्रती तीव्र दुःख व्यक्त करत सांगितले की, “राज्य सरकार या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. मृतांच्या वारसांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर शिक्षण, रोजगार आणि पुनर्वसन यासाठीही सरकार विशेष प्रयत्न करेल.” (हेही वाचा – ब्रेकिंग : एटीएममधून पैसे काढणं महागणार, 1 मेपासून नवे दर)
यासोबतच या हल्ल्यातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदाचा विशेषाधिकार वापरत, सरकारी सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहे. (हेही वाचा – 10वी, 12वी चे निकाल कधी जाहीर होणार ? संभाव्य तारखा पहा !)